जामखेड प्रतिनिधी : १० सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील एकमेव असलेला खैरी मध्यम प्रकल्प
काल दि.९ सप्टेंबर रोजी ८० टक्के भरला असुन.भारतीय हवामान विभागाने ९ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील खर नदीकाठावरील मौजे वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव
तसेच उस्मानाबाद जिल्हा परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक व पांढरेवाडी येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. याबरोबरच याच भागातील नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन खैरी मध्यम प्रकल्प, खर्डा पुर नियंत्रण कक्ष येथे भ्रमणध्वनी क्र. 9420017290 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment