(खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले (वय २५) या तरुण आईने आपल्या दोन मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.आत्महत्या केलेल्यांमध्ये रूपाली उगले यांच्यासोबत मुलगा समर्थ (वय ५) आणि मुलगी चिऊ (वय ३) यांचा समावेश आहे. पती नाना उगले, पत्नी रूपाली, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जण घरात राहत होते. मुलं शाळेतून आल्यावर रूपालीने त्यांना गणवेशातच विहिरीवर नेले आणि तिघांनी एकत्रितपणे विहिरीत उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आणि नातेवाईक दाखल झाले. मृतदेहांना विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, खर्डा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.नेमकं प्रकरण काय घातपात की आत्महत्या असा सवाल नागरिकांमधून उपस्थित झाला असून चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा