खर्डा प्रतिनिधी : २३ सप्टेंबर
खर्डा येथे कोणत्याही उत्सवापेक्षा शारदीय नवरात्र उत्सवला मोठे महत्त्व आहे. या उत्सवाची सुरूवात सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी होणार असून याच पार्श्वभूमीवर खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच शांतता बैठक पार पडली. या बैठकीत नवरात्र उत्सव मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी. वाहतुकीस कोणताही अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांना स्वतंत्र व्यवस्था करावी. अशी साऊंड चा आवाज कमी ठेवावा असे विविध निर्णय घेत ही बैठक संपन्न झाली.
तसेच खर्डा शहरात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करणारे ७ मंडळं आहेत. यामध्ये बसस्थानकालगत १, चौंडेश्वरी, खडकपुरा, शुक्रवारपेठ आणि दलित वस्ती या ठिकाणी मोठे मंडळे आहेत.
तसेच प्रत्येक दिवशी मंडळाला पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. संपूर्ण नवरात्रीत मिरवणूक इतर कार्यक्रम कायदा सुव्यवस्थेचा पालन करण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सदस्य राजू मोरे, योगेश सुरवसे, गणेश सूळ, बबलू सुरवसे, राजू लोंढे, विशाल साळुंखे, रोहित भंडारे, अवि सुरवसे, गणेश नेहरकर, मिथुन काळे, अरविंद गुजर, दादा मोरे, सचिन सुरवसे, भैय्या चौगुले, महेश डोके ,सुनील डोळे, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र येथील सरपंच, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्याचा पोलीस स्टेशनला विसर.
खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने जरी नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तची पुर्व तयारी करण्यात आली असली तरी. पोलीस स्टेशन स्थापनेनंतर हे नवरात्रोत्सवाचे पहिलेच वर्ष आहे. खर्डा परिसरात मोठे पर्यटन व याठिकाणाहून तुळजापूर व येरमाळा कडे जाणाऱ्या देवीच्या पालख्या, पलंग व येणाऱ्या ज्योती तसेच नऊ दिवस चालणाऱ्या उत्सावा दरम्यान डोळ्यात तेल घालुन काम करावे लागणार आहे. कारण खर्डा येथे पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा सरकारचा जो हेतू होता त्यादृष्टीने या ठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. बसस्थानक परिसरातील अवैध व्यवसाय, शाळा परिसरातील सडकछाप रोडरोमिओ, बसस्थानकावर होणाऱ्या प्रवाश्यांच्या चोर्या, दारुडे व व्यसनी लोकांचा उपद्रव थांबवण्यात किंवा प्रतिबंधित कारवाया करण्याचे
अजूनही म्हणावे तसे यश खर्डा पोलीसांना आल्याचे दिसून येत नाही. खर्डा पोलीसांकडून गणेश उत्सावा दरम्यान काढलेला रूट मार्च सोडता लक्षवेधक कारवाई होताना दिसली नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले बुवासाहेब खाडे महाराज प्रकरणास ३६ दिवस उलटले तरी काहीच प्रगती दिसत नसल्याने तेरीभी चुप मेरीभी चुप भुमीका असल्याचे दिसत आहे. यापुढे तरी पोलीस स्टेशनकडून खर्डा बसस्थानक परिसर व शहरातील गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी नागरिकांकडून होत असलेल्या अपेक्षाची पुर्ती होईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
No comments:
Post a Comment