पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ जुलै
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप झाला असुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठे बंड करत ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले असून त्यांच्यासह ३५ आमदार फुटले असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
यानंतर मोठी घडामोड होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सरकारमधे सामील झालेल्या अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने आता महाराष्ट्रला दोन उपमुख्यमंत्री मिळेल आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने या टर्ममध्ये तिसऱ्यांदा ही शपथ घेतली आहे.
या घटनेमुळे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेने नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फुट पडल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment