पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १२ आॅगस्ट
शिर्डी व हैद्राबाद या देशातील दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा व खर्डा या ऐतिहासिक शहरातून जाणाऱ्या महत्त्वाच्या शिर्डी-हैद्राबाद या महत्त्वाच्या राज्य महामार्गाच्या संरक्षक भिंतचे काम होत असून रस्त्यावर असलेल्या दरडवाडी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हे काम अतिशय निकृष्ट होत असून अक्षरशः या ठिकाणी संरक्षक भिंतीसाठी पाया न करता मातीवर निकृष्ट दर्जाचे काँक्रेट टाकून त्यावर भिंत बांधली जात असून भिंतिचेही काम दर्जेदार होत नसल्याचा आरोप करत याची चौकशी करून हे काम दर्जेदार करण्याची मागणी दरडवाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम बळीराम दराडे, आनंदवाडीचे सरपंच नितीन गिते, आनंदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य भारत होडशिळ यांनी केली आहे.
या बाबत जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या
शिर्डी-हैद्राबाद राज्य महामार्गाचे मौजे दरडवाडी गावाच्या जवळ रस्त्यावरील वळणावर सुरक्षा भिंतीचे काम चालू असून वळणाच्या खाली लोकवस्ती आहे. सदर भिंतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून त्या कामाला पाया (फाऊंडेशन) न करता हे काम पूर्णपणे मातीवर चालू आहे. यामुळे काम हे काम याच पध्दतीने झाले तर त्या कामामुळे येथील लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर कामावरील अभियंत्याला (इंजिनिअर) संपर्क केला असता, ते फोन उचलत नाही. तसेच ठेकेदाराकडूनही योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हे काम झाल्यास ग्रामस्थ व रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी मोठा धोका होऊ शकतो
यामुळे या कामाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने या रस्त्यावर अंदोलन केले जाऊ शकते.
तरी प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन होणारे नुकसान टाळावे असे आवाहन दरडवाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम बळीराम दराडे, आनंदवाडीचे सरपंच नितीन गिते, आनंदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य भारत होडशिळ यांनी केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रति जिल्हा अधिकारी अहमदनगर व सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment