जामखेड प्रतिनिधी : १९ सप्टेंबर
सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचे असून यासाठी शालेय जीवनात कष्ट केले तरच पुढील आयुष्य सुखाचे जाईल. तसेच सामाजिक व कुटुंबाची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केला.
जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा व समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२ या अनुषंगाने रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथे
घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी तसेच MHT-CET या परीक्षेत ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे ४४ गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी भजनावळे, स्कुल कमिटी सदस्य बाजीराव पठाडे, प्रशांत पाटील, डॉ. ईश्वर हजारे, महावीर पोफळे (अध्यक्ष व उपाध्यक्ष,सदस्य शाळा व्यवस्थापन समिती), डॉ दीपक वाळुंजकर, अनिल सरोदे, शंकर ढगे, लहानु आव्हाड, प्रभाकर हजारे, गणेश देवमाने, कांतीलाल वाळुंजकर , संदीप काळे, दीपक देवमाने, संदेश हजारे, मुख्याध्यापक एम. आर. सुपेकर, आरती दीपक देवमाने, बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे पालक,
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रकाश पोळ म्हणाले कि, मुलांना पालकांनी परिस्थीची योग्य जाणीव करून देत शिक्षण देणे महत्वाचे आहे. तरच मुले परिस्थितीची जाणीव ठेवून आभ्यासाकडे लक्ष देतील. ग्रामीण भागात सातत्याने गरिबी, बेरोजगारीचे दृष्टचक्र चालत राहिले आहे. त्यामुळे ते थांबवायचे असेलतर विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन उच्च शिक्षित होऊन स्वताची व कुटुंबाची आर्थिक प्रगती करणे क्रमप्राप्त आहे. समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थाच्या चेअरमन आरती दीपक देवमाने यांनी विद्यर्थ्याना सन्मान चिन्ह देऊन विद्यर्थ्यांच्या पाठीवर जी थाप दिली आहे ती त्यातून अनेक विद्यर्थी प्रेरणा घेतील. पतसंस्थेने सामाजिक जाणीववेतून केलेल्या कामाची समाज नक्कीच दखल घेईल. असे मत पोळ यांनी यावेळी व्यक्त केले.
चौकट..
शाळेच्या बाबतीत प्रामाणिक प्रयत्न करू- आरती देवमाने
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथे घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थीचा सन्मान करणे व त्यांच्या मिळालेल्या यशा मध्ये समृद्धी परिवाराला सहभागी करून घेतल्याने मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचे कायम ऋणी राहू तसेच शाळेच्या बाबतीत जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. संस्थेच्या माध्यमातून अनेक युवा उद्योजक यांना सहकार्य करत असल्याचे समृद्धी पतसंस्थाच्या संस्थापक अध्यक्षा आरती देवमाने यांनी सांगितले.
पारितोषिक वितरण विशेष सहाय्य व्ही. बी. थेटे,ए. आर. रणखांब, बी. पी. रोही, व्ही. इ. ओव्हाळ सर्व शिक्षक व इतर कर्मचारी.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे एस एल, सूत्रसंचालन येवले बी. बी. तर आभार एस के नाळे यांनी मानले
No comments:
Post a Comment