जामखेड प्रतिनिधी : २५ आॅक्टोबर
अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना अनेक वेळा सांगुनही काही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांनी गावातील दारू बंद करावी यासाठी जामखेड तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला शेकडो सह्यांचे निवेदन दिले आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ आहे. त्या अनुषंगाने चोंडी गाव हे पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. मात्र गावचे प्रवेशद्वारावरच चिकनचे दुकान टाकले आहे. परंतु त्यामधूनच अवैध्य दारू विक्री केली जाते. तेथील दारू पिणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा पर्यटकांशी हुज्जत घातलेली आहे. त्यांना सांगायला गेले तर दम देतात दांडगाव्याची भाषा करतात. ग्रामपंचायतला सांगितले तरी काही निष्पन्न होत नाही. मग ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा. तर मग आम्ही आपणाला निवेदन देत आहोत. आपण यावर कार्यवाही करून संपुर्ण चोंडी गाव दारू मुक्त करावे अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदना मार्फत करण्यात आली आहे.
दुसरा एक दारूचा गुत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अण्णासाहेब डांगे यांनी निर्माण आश्रमशाळा या दोन्ही शाळांपासून १०० मीटरच्या आत आहे. त्याला पण सांगितले पण काही ऐकत नाही. शाळेत येणाऱ्या लहान मुलांवरही याचे वाईट परिणाम होत आहेत. या सर्व कारणांमुळे आम्ही गावकरी आपणास नम्र विनंती करत आहोत आपण यात काळजीने लक्ष घालावे व गावतील आई, बहीण यांचे संसार दारूने जे उध्वस्त होण्यापासून वाचावेत, यावर गांभीर्य पूर्वक विचार करून गावातील नागरिकांना व भगिनींना न्याय द्याल ही अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देताना
विजय भांडवलकर, शरद शिंदे, दादा सोनवणे, दीपक मोरे, विनोद साठे, काळू सोनवणे उपस्थित होते.
चौकट...
चोंडी हे गाव आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ आहे. तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांचेही गाव आहे.
No comments:
Post a Comment