जामखेड प्रतिनिधी : १८ आॅक्टोबर
राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना दिले असून जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना तशा सूचना दिल्या असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार ने नुकसानग्रस्त अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश व तहसीलदार यांच्या सुचने नुसार उद्या दि १९ आॅक्टोबर पासून हे पंचनामे सुरु होणार आहेत तरी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की आपण तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे. पंचनामे करत असताना आपली आपल्या मोबाईल वरून पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी जेणेकरून अनुदान देणेकामी अडचण होणार नाही
तसेच जे शेतकरी आपल्या पिकाची नोंद मोबाईल वरून करणार नाहीत त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही याची दखल घ्यावी असेही आवाहन भाजपा कर्जत- जामखेड विधानसभा प्रमुख
रविंद्र रामनाथ सुरवसे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment