खर्डा प्रतिनिधी : १ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा हे पंचक्रोशीतील सर्वात मोठे गाव आहे. बारा वाड्या व तेरावा खर्डा अशी गावाची ओळख आहे , तर १७ सदस्य असणारी अशी येथील मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र खर्डा ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे खर्डा येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंदू परंपरेनुसार दिवाळी हा सर्वात मोठा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. मात्र हा सण खर्डावाशियांना पाण्याशिवाय साजरा करावा लागला आहे. खर्डा गावाला पाणीपुरवठा करणारे मोहरी व खैरी हे दोन्ही तलाव नुसते भरलेले नाहीत तर तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र दिवाळीच्या अगोदर पासून खर्डा गाव पाण्यासाठी तहानला आहे. नागरिकांना गेले पंधरा दिवस झालं नळाला पाणी सुटत नसल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीतच खर्डा या गावाला पाणीच सोडलं गेलं नाही. पाणी नेमके येणार तरी कधी? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे. ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी नागरिकांची आवस्था झाली आहेपाण्याचा प्रश्न लवकरात लवकर न सुटल्यास गावकरी अंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
Good job
ReplyDelete