खर्डा प्रतिनिधी : ३० नोव्हेंबर
वारंवार डि. पी. जळाल्याने खर्डा शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातील विस्कळीत पणाला विज वितरण कंपनीच जबाबदार असून त्यांना अनेक वेळा सुचना देऊनही डिपीवरील अनाधिकृत कनेक्शन काढण्यात केलेल्या हलगर्जीपणामुळेच खर्डा वासियांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
तरी विजवितरण कंपनीनने यापुढे तरी अनाधिकृत विज कनेक्शन काढून खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा शहराला सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्पावरून पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र 63 एच.ची. डीपी बसविण्यात आली आहे, या ठिकाणी खर्डा ग्रामपंचायतने 25 एच. पी. ची मोटर बसवली आहे तर सातेफळ ग्रामपंचायत ने 10 एच.पी. ची मोटर याठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी बसवली आहे,
परंतु खर्डा शहराच्या डीपीवर सातेफळ येथील काही लोकांनी अनधिकृत कनेक्शन घेऊन स्वतःच्या शेतीपंपासाठी मोटारी बसवल्या आहेत.त्यामुळे खर्डा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या डीपीवर अनेक वेळा लोड येऊन सदरची डीपी आतापर्यंत सतरा वेळा जळाली आहे.
याबाबत विज वितरण कंपनीकडून सदर अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या लोकांवर कारवाई केली जात नाही,
सदरची डीपी पुन्हा तीन दिवसांपूर्वी अनधिकृत कनेक्शनच्या फटक्याने पुन्हा जळाली आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने तळ्यात पाणी भरपूर असूनही खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्यावर यामुळे ताण येत आहे. खर्डा ग्रामस्थ या डीपी जळाल्याच्या कटकटीला वैतागून गेले आहेत.
चौकट
खर्डा ग्रामपंचायतने विज वितरण कंपनीकडे लेखी मागणी करून सदरचा अनधिकृत कनेक्शन करण्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणी केली आहे, परंतु याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तसेच डीपी जळल्यानंतर ग्रामपंचायतने आतापर्यंत प्रत्येक वेळी 13 हजार रुपये रुपयाचा भरणा हा डीपी साठी वीज वितरण कंपनीकडे केला आहे. लवकरच खर्डा शहराचा पाणीपुरवठा सुरू होईल.
ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते
No comments:
Post a Comment