खर्डा प्रतिनिधी : २३ नोव्हेंबर
खर्डा व परिसरातील वाड्या वस्त्यांवर काही दिवसापूर्वीच दिवसा ढवळ्या घरफोडीचे प्रकार झाले आहेत जर त्या ठिकाणी ग्राम सुरक्षा यंत्रणेची सुविधा असते तर कदाचित आपण या चोऱ्या रोखू शकलो असतो. व झालेले नुकसान टाळू शकलो असतो.
आता आपल्याला ग्राम सुरक्षा यंत्रणेचे कवच मिळाले आहे. त्यामुळे इथून पुढे असे प्रकार फारच कमी होतील असे मला वाटते. खर्डा पोलीस स्टेशन झाल्यापासून येथील सुरक्षतेतेचा विषय व गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पोलीस कर्मचारी संभाजी शेंडे व शशिकांत मस्के हे नेहमीच चांगले काम करत असतात. कोणतीही घटना असू द्या तात्काळ घटनास्थळी भेट देतात. पोलीस स्टेशन आल्यापासून खरच गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत आहे. असे मत सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी व्यक्त केले.
खर्डा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नाशिक विभागाचे संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा डी. के. गोर्डे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित सर्वांशी संवाद साधून ग्रामसुरक्षा एप्लीकेशनचेचे फायदे सांगितले. ग्राम सुरक्षा यंत्रणा आपत्कालीन व्यवस्थापन व सुरक्षेसाठी किती उपयुक्त ठरेल. आपण एक कॉल केल्यानंतर तो संपर्क सर्वांशीच कसा साधला जाईल व संबंधित अपत्तीग्रस्त व्यक्तीला कशी मदत करता येईल हे सविस्तर सांगीतले.
यावेळी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, संचालक ग्राम सुरक्षा यंत्रना डी. के. गोर्डे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, मदन पाटील,सोपान गोपळघरे, राजू मोरे, महालिंग कोरे, विकास शिंदे, अशोक गीते, भीमा घोडेराव ,पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, संभाजी शेंडे, धनराज बिराजदार, संपादिका श्वेता गायकवाड, दत्तराज पवार, अनिल धोत्रे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment