जामखेड प्रतिनिधी : २८ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्याबाबत विज वितरण कंपनी व शिंदे - फडणवीस सरकारकडून दिशाभूल केली जात असून राज्यातील शेतकऱ्यांची विज कनेक्शन कापण्याची कारवाई न थांबवल्यास विज वितरण कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यास शेतात येऊ दिले जाणार नाही. आणि जर कोणी आल्यास त्याला शेतकऱ्यांनी चाबकाचे फटके दिल्यास संबंधित कर्मचारी त्यास स्वतः जबाबदार राहिल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी व केले आहे.
जामखेड तालुक्यातील शेती पंपासह कोणतेही कनेक्शन न तोडणे, शेतकऱ्यांची सक्तीची विज बील वसुली थांबवणे, जळालेल्या डी.पी त्वरित बदलून देणे, वाड्या-वस्त्यांवर सिंगल फेजची त्वरित व्यवस्था करणे, मीटर रिडिंग प्रमाणे लाईट बिल देणे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दि. २८ नोव्हेंबर रोजी जामखेड पंचायत समिती येथून तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय येथे आल्यावर या मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित जनसमुदायाच्यावतीने वतीने त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतकरी विज वितरण कंपनीच्या विरोधातील तिव्र भावना व्यक्त केल्या.
या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव भोसले, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, राहुल उगले, माजी नगरसेवक मोहन पवार, संजय वराट, सुरेश भोसले, बापू शिंदे,
प्रा. कुंडल राळेभात, वसीम सय्यद, प्रकाश सदाफुले, सुंदरदास बिरंगळ, प्रकाश काळे, काँग्रेस प्रदिप शेटे, उद्योजक रमेश आजबे, अमोल लोहकरे, संजय डोके, महेश राळेभात, ऋषिकेश कुंजीर, महादेव कात्रजकर, हरिभाऊ आजबे,
प्रसन्न कात्रजकर, विजय पवार, किसन ढवळे, , निलेश पवार, बबन देवकाते, महालिंग कोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, विज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची इतरही बाबतीत पिळवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांना जेव्हा लाईटची आवश्यकता असते तेव्हा वीज वितरण कंपनीकडून बिलं भरण्याचा अट्टाहास केला जातो. किंवा वीज कनेक्शन कापले जाते. यामुळे वीज वितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ नये. यापुढे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वीज कनेक्शन कट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात येऊ दिले जाणार नाही. वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्याच्या शेतात पोल लावताना परवानगी घेतली जात नाही. मात्र ते पोल शेतकऱ्यांना अडचण ठरत असताना जर काढण्याची मागणी केली तर वीज कंपनीकडून मोठ्या रकमेची आकारणी केली जाते. अशा विविध प्रकारचा गलथान कारभार वीज वितरण कडून कायमस्वरूपी
चाललेला आहे. म्हणून वीज वितरण च्या विरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सध्याच्या या तीन महिन्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे जर उद्रेक झाला तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात गेले आणि जर तुमच्याविरुद्ध काही अनुचित प्रकार घडला तर यात वावगे वाटून घेऊ नये असा सुचक ईशाराही राळेभात यांनी दिला. तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले की. या जमिनीवर आता नवीन घरे होऊ देऊ नयेत. मात्र पूर्वी झालेली घरे उठवू नयेत. अशी आमची मागणी आहे. याबाबत आ. रोहित (दादा) पवार यांनी मागील महिन्यातच शासनाला पत्र देऊन गायरानावरील घराचे अतिक्रमणे नियमित करावीत अशी मागणी केली होती. तसेच तालुक्यातील वीट भट्टी ला दिली जाणारी रॉयल्टी बाबत तहसीलदारांनी योग्य निर्णय घेऊन वीट भट्टीचे व्यवसाय कसे सुरू होतील यासाठी प्रयत्न करावा. कारण या व्यवसायावर तालुक्यातील २०० च्या वर कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. यामुळे वीटभट्टी चालकांच्या वाढीचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी ही मागणी प्रा. मधुकर विभाग यांनी यावेळी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे आदींसह अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तिव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी मागण्यांची निवेदने नायब तहसीलदार भोसेकर विज वितरण कंपनीचे उपअभियंता योगेश कासलीवाल यांना देण्यात आली.
यावेळी सरकार व विजवितरण कंपनीच्या नावाने बोंबाबोंब अंदोलनही करण्यात आले, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment