कर्जत प्रतिनिधी २६ नोव्हेंबर
२६ नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे भारतीय संविधान हे जगातले सर्वात मोठे संविधान आहे. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते.
भारतीय डाक विभागाच्या कर्जत उपविभागात संविधान उद्देशिकेचे पूजन व वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान नुसार प्रत्येक नागरिकाला स्वांतत्र्य, समता, धार्मीक, सांस्कृतिक, मुलभूत हक्क दिले आहेत. संविधान हा भारत देशाचा आत्मा आहे.
कर्जतचे पोस्टमास्तर बाळासाहेब वाळुंजकर यांचे संविधान उद्देशिकाचे वाचन केले. यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख व संघटनेचे जेष्ठ नेते चंद्रकात नेटके यांनी संविधानाचे महत्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले परिश्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार कसे झाले ते सांगितले. संविधान प्रतिमा पुजन व वाचन करून अभिवादन करण्यात आले.
तसेच या 26 नोव्हेंबर ला मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिक व नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली
यावेळी दिलीप खरात, दुर्गेश शेटे, सुनिल धस, दिपक काळे, सिमा भोसले, गणेश हजारे, सुरज तोरडमल आदि उपस्थित होते
No comments:
Post a Comment