जामखेड प्रतिनिधी : २३ डिसेंबर
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले यावरून हे लक्षात येते विरोधी पक्षांनी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडू नये. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष बेळगाव सिमा प्रश्नाकडे व देशातील महापूरूष व श्रध्दास्थान यांचे वेळोवेळी होत असलेले अवमान याकडे लागलेले लक्ष दुसरीकडे परावर्तित करण्याकरिता जयंत पाटील यांच्या निलंबनाची कुटनिती सरकारने केली आहे. या नितीचा व ही निती वापरणाऱ्या विरोधी पक्षाचा जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.
वादविवाद वाढू नयेत हे बोलत असतानाचा शब्द पकडून सत्ताधाऱ्यांनी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाचा डाव खेळणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा निषेध करत आहेत अशा अशयाचे निवेदन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.
सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे माजी आरोग्य समीतीचे सभापती मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, आदिवासी महासंघाचे जिल्हा नेते प्रकाश काळे, माजी नगरसेवक अमित जाधव, पवन राळेभात, दिगांबर चव्हाण, अनिल जावळे, सुरज राळेभात आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment