खर्डा प्रतिनधी : २४ डिसेंबर
अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची ५०० फुट अंतराची जाचक अटी कमी करून योजनेचा निधी वाढवावा अशी मागणी कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आ. रोहित पवार यांच्याकडे जामखेड तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच शिवाजी भिवाजी ससाणे यांनी केली आहे.
ही मागणी एका निवेदनाद्वारे केली असून निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती, नवबौध्द व आदिवासी शेतकरी यांच्या उन्नतीसाठी आपल्या शेतात नवीन विहीरी खोदण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. मात्र यासाठी सद्या दिले जात असलेल्या अनुदानाची रक्कम अपूरी आहे. तसेच दोन विहिरींमधील अंतर ५०० फुट अंतर असलेली जाचक आट असल्याने मागासवर्गीय शेतकरी हया योजनेपासून वंचित राहत आहेत.
तसेच इतर दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांसाठी ५०० फुट अंतराची अट नाही व त्या योजनेसाठी ४ लाख रुपयांपर्यंत निधी मिळतो. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला अडीच लाख निधी मिळतो. MRGS योजने प्रमाणे ४ लाख निधी व ५०० फुट अंतराची अट याही योजनेसाठी काढून टाकावी अशी मागणी नायगाव येथील माजी सरपंच शिवाजी भिवाजी ससाणे यांनी केली असून हा विषय तुमच्या मार्फत हिवाळी अधिवेशनात ठराव मांडून मंजूर करून घ्यावा. असे झाले झाले तर अनुसूचित जाती व आदिवासी बांधवासाठी एक मोठा निर्णय होईल व कायमस्वरूपी शेतकरी बांधव आपले ऋणी राहतील. तरी या मागणीचा सहानुभूती पुर्वक विचार करावा असेही अवाहन माजी सरपंच शिवाजी ससाणे यांनी केले
आ. रोहित पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केले आहे.
No comments:
Post a Comment