खर्डा प्रतिनिधी : २७ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत वतीने आज झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांचा पाढा वाचला. कधी कधी आठ आठ दिवस गावात पाणी येत नाही. नागरिकांनी विचारणा केली तर मोटार जळाली आहे. डि. पी. ब्लास्ट झाली आहे असे सांगितले जाते, तसेच पिण्याच्या पाण्याचे टी. डी. एस. तपासणी केली जात नाही. बचत गटांनी मागणी करूनही त्यांना जागा उपलब्ध करून दिली जात नाही. अशा अनेक सुविधा असून ग्रामपंचायत प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करत असून याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच यामध्ये लक्ष घालून खर्डावाशियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आज ग्रामसभेसाठी उपस्थित नागरिक तसेच गावातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
खर्डा जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावांत तालुक्यातील सर्वात मोठी सर्वात मोठी म्हणजेच ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. तसेच याठिकाणी असलेली ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आहेत तसेच आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार हे या गावाच्या विकासासाठी करत असलेली कामे पाहता खर्डा गावाला पर्यटनाच्या दृष्टीने खुप महत्व आले आहे. मात्र खर्डा ग्रामपंचायत प्रशासनाला याचे काहीही देणेघेणे नसल्याचे आज ग्रामस्थांनी व महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नावरून दिसत आहे.
आज दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेबाबत सांगायचे झाले तर ग्रामसभेत नागरिक संतपलेले दिसून आले. तसेच गवंडी गल्लीमध्ये महिलांचा शौचालय तर झालं पण गेली अडीच वर्षे शौचालयात सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे पाणी आलेले नाही. असा प्रश्न महिला व नागरिकांनी मांडला. गेली अडीच वर्षे तेथील वॉर्ड सदस्य व ग्रामपंचायत लक्ष देत नाही हे दिसून आले.
गेले कित्येक महिन्यांपासून महिला ग्राम संघ बचत गटासाठी जागा शोधून ऑफिससाठी मागत आहेत. तसेच ग्रामसभेतही अनेक वेळा प्रश्न मांडला. मात्र ग्रामपंचायतने अजूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.
सार्वजनिक पाणीपुरवठ्याबाबत तर नागरिकांमधून नेहमी चर्चा असते. गावात आठ आठ दिवस पाणी सोडले जात नाही. जर ग्रामपंचायतला विचारणा केली तर मोटर जळाली आहे. डिपीचा ब्लास्ट झाला आहे असेच उडवा उडवीची उत्तर सांगितली , जातात.
याबरोबरच खर्डा बसस्थानकावर महिलांसाठी व प्रवाशांसाठी शौचालयचा प्रश्न, दूषित पाणी, पाण्याचे टी. डी. एस. न तपासणे, सोनेगाव चौकाचे बजरंग चौक नामकरण करणे, बसस्थानक परिसरात स्वछता करणे, खाजगी दवाखाने रात्री उघडत नसल्याने रूग्णांना येणाऱ्या अडचणी, सरकारी दवाखान्यात दोन डॉक्टर असताना होणारी गैरसोय, उघड्यावर शैचस बसणाऱ्यावर कारवाई करणे असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होते करण्यात आले. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य उत्तरे न मिळाल्याने उपस्थित महिला व ग्रामस्थ संतप्त झाले होते. तसेच ग्रामपंचायतही फक्त ठेकेदारांसाठीच राहिली आहे का?
कारण ग्रामपंचायत प्रशासन लोकांचे प्रश्न सोडवताना दिसत नाही. अश्याही संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमधून येत होत्या.
दरम्यान दि. २७ जानेवारी रोजी ग्रामसभेत उपस्थित झालेले व ग्रामस्थांच्या नेहमीच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही व कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत असल्याचे दिसत आहे.
.
No comments:
Post a Comment