जामखेड प्रतिनिधी : २७ जानेवारी
या मतदारसंघासात दोन कर्तव्यदक्ष आमदार पण रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. माझ्या गाडीचे दोन्ही टायर फुटले, कार्यक्रमासाठी येताना जीव मुठीत धरून आलो. अशी खंत तसेच पत्रकारांनी वंचित घटकाला न्याय देण्यासाठी काम करावे
विद्यार्थ्याचा गुणगौरव करावा. ८० टक्के बातमीदारी व २० टक्के सामाजिक काम करावे. आपल्या लेखनातून कोणाचे जीवन उद्ध्वस्त होईल असे लिखाण करू नये. जामखेड शाखेने जे पुरस्कार दिले ते योग्य व्यक्तींना, पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डाॅ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.
काल दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन व अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यस्मरण प्रसंगी जामखेड शाखेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व भाजपाचे युवक नेतृत्व अमित चिंतामणी, संघटनेचे जामखेड शहराध्यक्ष फायकअली सय्यद, सरचिटणीस संजय वारभोग, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक वीर, सत्तार शेख, अविनाश बोधले,किरण रेडे, संतोष बारगजे, श्वेता गायकवाड,
पप्पू सय्यद, संतोष गर्जे, राजू भोगील, अनिल धोत्रे, अजय अवसरे लाड, जगताप, पोकळे, पाराजी टेमकर, यांच्या सह आष्टी, करमाळा, जामखेड परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. विश्वास आरोटे म्हणाले की,
कर्जत जामखेडच्या दोन्ही आमदरांचे नाव राज्य पातळीवर
आहे. पण जामखेडला येण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. एकदा एखादा पाहुणा आला तर परत आयुष्यात जामखेडला नको रे बाबा असे म्हणेल. तुमचे आमदार राज्यात डंका पिटवतात पण धड रस्ता नाही हे मोठे दुर्दैव आहे असेही यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. हनुमंत निर्मळ (वैद्यकीय) प्रफुल्ल सहस्रबुद्धे (पत्रकारिता), राम ढेपे शाखा (प्रशासन) गफ्फार पठाण (समाजसेवा), विजय काळे (शैक्षणिक) या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित चिंतामणी म्हणाले की,
पत्रकारांकडून पुरस्कार मिळणे मोठा सन्मान आहे. आता सन्मानामुळे त्यांना काम करण्यासाठी अधिक उर्जा मिळेल. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे असते.
यावेळी प्रफुल्ल सहस्रबुद्धे म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे आपल्या सहकारी मित्राने केलेल्या कामाच्या कौतुकाची थाप दिली आहे. आपले क्षेत्र ठरवून काम केले पाहिजे म्हणजे ते मनासारखे करता येते. पत्रकारितेत पन्नास टक्के महिलांचा सहभाग असावा म्हणजे समाजाचे खरे चित्र समाजापुढे येईल, सन्मान हा कर्तृत्वाचा असतो. माणुसकी हाही घटक महत्त्वाचा आहे. आपल्या अंगातील कला आपल्याला योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे.
यावेळी फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत, उत्तम बोडखे, संतोष दाणी, सुदाम वराट, राम ढेपे, विजय काळे, मीना राळेभात यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित पत्रकारांना प्रवाशी बॅगा व संघटनेची ओळखपत्र वितरित करण्यात आली. तसेच सर्वांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रेडे यांनी तर आभार अविनाश बोधले यांनी मानले.
No comments:
Post a Comment