खर्डा प्रतिनिधी : २७ जानेवारी
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पदवीधर मतदारांनी दि. ३० जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या मतदाना दिवशी शांततेत मतदान करावे. तसेच यासाठी खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपळघरे यांनी पण सहकार्य करावे. ग्रामपंचायत मार्फत आवश्यक ती मदत करावी. असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी केले.
आज दि. २७ जानेवारी रोजी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये आज पदवीधर विधान परिषद निवडणूक संदर्भात शांतता कमिटी बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. यावेळी उपस्थित खर्डा सरपंच आसाराम गोपळघरे खर्डा व परिसरातील पदवीधर नागरिक व पोलीस कर्मचारी आणि पत्रकार श्वेता गायकवाड , अनिल धोत्रे आदींसह मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशनची स्थापना झालेपासून करण्यात आलेल्या व आगामी काळात गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. यावेळी सपोनि. प्रकाश पाटील म्हणाले की अलिकडेच बालविवाह बाबत एक घटना समोर आली आहे त्याबाबत योग्य ती कार्यवाही करत आहेत. मात्र खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील आपटी, आनंदवाडी, नायगाव, जातेगाव, मोहरी, बांखडक, सातेफळ ,धनेगाव, जायभायवाडी, दिघोळ ,जवळके, धामणगाव ,देवदैठण, या गावांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. चांगल्या समाज निर्मितीसाठी बालविवाह धोकादायक ठरू शकतात. ते रोखण्यासाठी पोलीस दलासोबत समाजानेही मोठे प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच गावातील प्रथम नागरिक सरपंच आसाराम गोपळघरे यांनी पण या गोष्टींसाठी सहकार्य केले पाहिजे व आपल्या व गावाच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर नागरिकांनी केला पाहिजे. तसेच खर्डा पोलीस स्टेशन २४ तास तुमच्यासाठी काम करत आहे. खर्डा पोलीस स्टेशन झाल्यापासून गुन्हेगारी कमी झाली आहे. विहीरी वरील मोटारी चोरी, वाहने चोरी, शाळेकरी मुलींचे प्रश्न. असे प्रश्न आम्ही सोडवले आहेत. तसेच बँक, एटीएम, व पर्यटन स्थळावर सीसीटीव्ही लावले पाहिजेत असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच गावातील प्रथम नागरिक सरपंच आसाराम गोपळघरे यांनी पण या गोष्टींसाठी सहकार्य केले पाहिजे व आपल्या व गावाच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर नागरिकांनी केला पाहिजे. तसेच खर्डा पोलीस स्टेशन २४ तास तुमच्यासाठी काम करत आहे. खर्डा पोलीस स्टेशन झाल्यापासून गुन्हेगारी कमी झाली आहे. विहीरी वरील मोटारी चोरी, वाहने चोरी, शाळेकरी मुलींचे प्रश्न. असे प्रश्न आम्ही सोडवले आहेत. तसेच बँक, एटीएम, व पर्यटन स्थळावर सीसीटीव्ही लावले पाहिजेत असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment