पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २४ मे
जामखेड (रत्नापूर) येथील रत्नदीप मेडीकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे विरूद्ध दि. ४ मे रोजी
बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय मुलीने दाखल केलेल्या विनयभंग गुन्हा प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच काॅलेज मधील मुलामुलींची विविध पध्दतीने केलेली पिळवणूक व शासनाची दिशाभूल करून विविध शाखांना मिळविलेल्या परवानग्यांसह संस्थेत चालणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करून डॉ. मोरे विरूद्ध कठोर कारवाई करावी यासाठी आज दि. २३ मे रोजी जामखेड येथिल खर्डा चौक येथे संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ यांनी केले, या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राजेंद्र काटकर, सचिव वाल्मिक रेडे, जामखेड मधील जेष्ठ नेते डॉ अविनाश पवार , चिलगर मेजर, ओंकार श्रीरामे , मोहन मामा गडदे, गणोश सुळ, मोहन देवकाते, नंदू खरात , तुषार बोथरा, सुरज पवार, उमेश मुळे, सचिन काशीद, नागेश लोंढे , आनंद खरात, सर्जेराव पाटील, बदामराव गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी मोरे च्या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्याच्या कारनामे जनतेसमोर मांडले यावेळी ज्या वृत्तपत्रात बातमी आली नाही त्या वृत्तपत्रांची होळी करण्यात आली.
यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले की रत्नदीप मेडीकल फौंडेशन ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर चा अध्यक्ष भास्कर मोरे याने शिक्षणासाठी आलेल्या अनेक मुलिंचे वेगवेगळ्या माध्यमातून शोषण केले आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषणातू या काॅलेजमध्ये शिकणाऱ्या दोन मुलिंनी आत्महत्या केल्या आहेत. तर अनेक मुला मुलींनी याच्या जाचाला कंटाळून शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. या नराधमाच्या कुकर्माचा अतिरेक होतं असताना ग्रामीण भागातील मुली बदनामीच्या भीतीने व शिक्षणात अडथळा निर्माण करून आपल्याला जाणीव पूर्वक नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला अथवा पोलिसांत जाऊन तक्रार करायला घाबरत असताना बी. एच. एम. एस. शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने ४ मे २०२३ रोजी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं आहे . मात्र या मुलीच्या तक्रारीचा गैरफायदा घेऊन पोलीस यंत्रणा व काही पत्रकारांनी आपले खिसे भरून घेतले व या गंभीर प्रकरणाची एक बातमी नाही अथवा पोलिसां कडून कोणतीही कडक कारवाई झाली नाही. पोलिस यंत्रणा, प्रशासन, प्रसार माध्यमे यांच्या सामाजिक जाणीवा बोथट व भ्रष्ट झाल्या आहेत म्हणून संभाजी ब्रिगेडने व राष्ट्रीय समाज पक्षाने मुलींच्या संरक्षणार्थ व सन्मानार्थ मैदानात उतरू आज जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले आहे. भास्कर मोरे या नराधमाने लैंगिक शोषणा बरोबर आर्थिक शोषणं देखील केले आहे. किरकोळ कारणावरून मुला मुलींनी वेळोवेळी आर्थिक भुर्दंड सहन केला आहे. मनमानी पद्धतीने फिसच्या नावाखाली पैसे उकळतं आहे. आपणास हा माणूस नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला तयार नाहीत.
या महाविद्यालयात सर्व कोर्स साठी आवश्यक सोईसुविधा नाहीत, लॅब,प्रयोगशाळा,शिक्षक संसाधने उपलब्ध नसताना याला मान्यता कशी मिळाली हा गंभीर विषय आहे .एकचं इमारत दाखवून दोन विद्यापिठांच्या मान्यता मिळाल्या कशा ? याने शैक्षणिक क्षेत्राची फसवणूक केली आहे काय ? या संदर्भात संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी करून हा शोषणाचा कारखाना कायम स्वरुपी बंद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आजं पासून सुरूवात करतं आहे. असे आवाहन सावंत यांनी केले
आजचा रास्ता रोको हा संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, व इतर सर्व संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ, भाजपचे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे मामा, तुषार बोथरा यांनी तिव्र भावना व्यक्त करत भास्कर मोरे विरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
चौकट
सदर विनयभंग प्रकरणी डाॅ. भास्कर मोरेवर कोणतीही गय केली जाणार नाही. त्याचा अटकपूर्व जामीन रद्द व्हावा किंवा त्याला कायमस्वरूपी जामीन मिळू नये यासाठी पोलीस यंत्रणेने पुर्ण तयारी केली आहे. अशा प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा सर्व मुला मुलींनी भास्कर मोरे यांच्या विरोधात पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात असेही आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment