पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १७ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत मध्ये पत्नी सरपंच असताना पती ग्रामपंचायत मध्ये वारंवार हस्तक्षेत्र करुन ग्रामस्थांना वेठीस धरतात. महाराष्ट्र (मुंबई) अधिनियम १९५८ (अ) अन्वये जो कायदा आहे. त्या अंतर्गत पतीराज मोडीत काडावा व नागरिकांना ग्रामपंचायतमधील पतीराज मधुन मुक्त करावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे वारंवार अर्ज करुन दखल घेतली जात नाही. या वरिष्ठ कार्यालयामार्फत योग्य ती कार्यवाही करावी व खर्डा ग्रामपंचायतमधील पतींचा कारभार बंद करावा अन्यथा दि. २४/०७/२०२३ रोजी रावसाहेब (बबलु) आण्णा सुरवसे यांनी खर्डा ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे
यापुर्वीही खर्डा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच व सदस्या यांच्या कुटूंबातील व्यक्तींचा कारभारातील हस्तक्षेप थांबविण्यात यावा व जे प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्याच मार्फत कामकाज करावे अशी मागणी वडार समाजाचे अध्यक्ष रावसाहेब (बबलू) आण्णा सुरवसे यांनी एका निवेदनाद्वारे खर्डा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते व खर्डा पोलीस स्टेशन यांच्याकडे दि.७ जुलै रोजी केली होती. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज दि. १७ जुलै रोजी रावसाहेब सुरवसे यांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, खर्डा ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य यांचे नातेवाईक व पती कामामध्ये हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्यामुळे विनाकारण नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहे.
तरी खर्डा, ता. जामखेड येथील सदस्य व सरपंच यांची योग्य ती चौकशी करून पतीराज, नियम मोडीत काढावा व नागरिकांची या अडचणींमधुन सुटका करावी अन्यथा असे झाले नाही तर दि.२४/७/२०२३ रोजी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा (बबलू) आण्णा सुरवसे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे .
खर्डा येथील वडार समाजाचे अध्यक्ष रावसाहेब (बबलू) आण्णा सुरवसे यांनी जरी ही मागणी केली असली तरी खर्डा ग्रामस्थांचेही हेच मत आहे. या नुसार तहसीलदार योगेश चंद्रे या मागणीचा विचार करून सरपंचपती व सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेप थांबतील का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment