पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२९ ऑगस्ट
जामखेड तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून पावसा अभावी शेतकऱ्यांच्या जळालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरुवात कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्यसमन्वक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी निवेदनाव्दारे केली असून याबाबतचे रितसर निवेदन काल दि- २८ आॅगस्ट रोजी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, हवामान खात्याने दिलेल्या
९८ टक्के पाऊस पडणार असल्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी धाडसाने कर्ज काढून बियाणे व खते खरेदी करून खरीपाची पेरणी केली आहे. आज रोजी जामखेड तालुक्यात ९० ते ९५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत .मात्र पावसाने दडी मारल्याने आता शेतकरी उदास चेहरे घेऊन गावच्या पारावर बसत आहेत. कर्जबाजारी झाल्याचा तणाव व कुटुंबाची उपजीविका चालवण्याची चिंता यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो.
शेतकऱ्यांनी पेरणी करून ५० ते ६० दिवस झाले परंतु कुठेही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात जळून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस पडेल अशी कोणतीही चिन्ह दिसून येत नाहीत. त्यामुळे बळीराजा पुरता धास्तावला आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत कारण मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, कांदा हे पिके जळून गेलेले असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
जनावरांच्या चाऱ्याचे देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस पुरेसा न पडल्याने कुठेही हिरवा चारा उपलब्ध नाही. तसेच विहीर व तलाव देखील कोरडे पडले आहेत त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची हाल सुरू झालेली आहे त्यातच तालुक्यामध्ये जनावरांना लंम्पी आजाराने ग्रासले आहे त्यामुळे शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ, उद्योजक दादा दाताळ, शहराध्यक्ष आजिनाथ शिंदे, जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, लोक अधिकार आंदोलन तालुका अध्यक्ष विशाल पवार, योगेश सदाफुले, गणपत कराळे, सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, मच्छिंद्र जाधव, रवी अंधारे, विशाल जाधव, शहानुर काळे, आलीस पवार, अंकुश पवार,मिंठु परखड, रघुनाथ परखड, लोणी सरपंच मिंठु शेंडकर,शिध्दु शेंडकर, आनंदवाडी येथिल शेतकरी सोपान खाडे, हनुमंत सांगळे, पिंपळगाव आवळा येथील विनोद बारवकर,भारत शिंदे गीतेवाडीचे शिवाजी चौधार, विकास गोपाळघरे, बाळगव्हाणचे ग्राम सदस्य सर्जेराव गंगावणे, काका शिकारे, कैलास शिकारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल दाताळ, द्वारका ताई पवार, रेश्मा बागवान, राजू शिंदे, संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, तुकाराम शिंदे, वैजीनाथ केसकर हे उपस्थित होते.
या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता ""शेतकरी बचाव"" असे जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात येणार आहेत,अशी माहिती तालुका अध्यक्ष अतिश पारवे यांनी दिली
No comments:
Post a Comment