पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १ सप्टेंबर
या देशांमध्ये आपण जसे जनावराचे कोंडवाडे पाहिले तसेच माणसाचेही कोंडवाडे होते. भारतामध्ये इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. त्यावेळी भटके विमुक्त समाजाच्या लोकांना आपले प्राण देऊन देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. इंग्रजांपुढे भटक्या विमुक्त समाज शरण गेला नाही त्यांच्याविरुद्ध लढला. त्यामुळे
इंग्रजांनी भटक्यांना महाराष्ट्रामध्ये जेलमध्ये कैद केलं. या देशांमध्ये कुठेही चोरी झाली की भटके भटक्यांना पकडून त्यांना गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येत होते. तर काही ठिकाणी त्यांना ठार मारण्यातही आले. त्यांच्या मुक्तीचा दिवस म्हणजे ३१आॅगस्ट म्हणून आपण प्रत्येक वर्षी हा दिवस भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करत असतो असे प्रतिपादन भटक्या विमुक्तांचे नेते ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी केले.
काल दि. ३१ आॅगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजाच्या वस्तीत भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी भटके विमुक्त यांच्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच संजीवनी पाटील, वडार समाजाचे अध्यक्ष बबलू सुरवसे, कपिल लोंढे, भानुदास शेळके, दिनेश चव्हाण, सुनील साळुंखे, स्वप्नील अंकुश, शाम सकट, पत्रकार श्वेता गायकवाड, धनसिंग साळुंखे, लहू पवार, पोलीस काॅन्स्टेबल शेषराव म्हस्के, वंचित जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, गणपत कराळे,आलेश शिंदे, सुनील काळे, विशाल पवार, शहानूर काळे, पूजा काळे, राजू शिंदे, दिपाली काळे, रेश्मा औटी, सलीम मदारी, हुसेन कासम मदारी, सरदार मदारी, हुसेन मादारी, मोहम्मद मदारी, मुस्ता मदारी, रमजान मदारी, अस्लम मदारी, मेहबूब रहीम मदारी आदींसह मोठय़ा संख्येने भटके विमुक्त बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच सौ. संजीवनी पाटील म्हणाल्या की, जोपर्यंत माझा सरपंच पदाचा कार्यकाल आहे. तोपर्यंत खर्डा ग्रामपंचायत मार्फत ज्या काही योजना येतील त्या गरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील तसेच गरीब वंचित शोषित पीडित यांच्यासाठी यांच्या हक्क अधिकारासाठी लढण्याचं काम करेल.
No comments:
Post a Comment