पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ ऑगस्ट
मागील वर्षी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५३ गावातील १५६०० शेतक-यांना ८ कोटी ७० लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील वर्षी शासनाने तातडीने पंचनामे केले परंतु, नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना वर्षे उलटले तरीही मिळाली नव्हती त्यासाठी आ. राम शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत अखेर ही मदत मिळाली आहे. सदर मदतीसाठी KYC केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे.
आ.प्रा. राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी लगेच मागणी मंजुर करत नीधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा अर्थिक हातभार लागणार आहे.
जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसान भरपाईचा एक वर्षापासुन रखडलेला प्रश्न मार्गी लावुन तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकरी वर्गमधून आभार व्यक्त केले जात आहे
No comments:
Post a Comment