पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ सप्टेंबर
साकत येथे दि.१४ रोजी सकाळी ९:३० वा स्मशानभूमी येथे सुशोभीकरण व वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन बबन गायकवाड यांनी सत्कार केला.
वृक्ष लागवड हा खरा विषायाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पाहत आहे की पाऊस पडत नाही उन्हाळ्यामुळे कधी तरी पाऊस पडतो. ज्या वेळेस आपल्याला थंडी पाहिजे त्या वेळेस थंडी पडत नाही म्हणजे वातावरणात जे बदल होत आहेत याचे कारण म्हणजे वृक्षतोड आहे पाऊस आपल्या पासुन दुरावला आहे जर पावसाला आपलंस करायचे असेल आणि पूर्वी सारखी आणायची असेल तर वृक्षारोपण काळाची गरज आहे असे मत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर म्हणाले की, लोकवर्गणीतून स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण व सुशोभीकरण होत आहे. या स्मशानभूमी मध्ये अतिक्रमण चा विषय झाला होता पण तो या तरुणांनी तो हाणून पाडला त्यामुळे या स्मशानभूमी मध्ये अतिक्रमणाचा विषय येत नाही झाडे लाऊन स्मशानभूमी सुंदर राहील आणि तरुणांनी चांगल्या सुविधांसाठी योग्य नियोजन करावे.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. अरुण जाधव म्हणाले की, काही जातींना स्मशानभूमी नाही पण सुदैवाने साकत ला स्मशानभूमी आहे हे अधिकृत आहे हे आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे ही गावाची संपत्ती आहे तिचा लोकवर्गणीतून योग्य विकास होत आहे लोकांनी याचा योग्य वापर करावा.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती संजय वाराट म्हणाले की, गावातील तरुणांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून स्मशानभूमी सुशोभीकरण व वृक्षारोपण कार्यक्रम घेतला हा चांगला उपक्रम आहे गावच्या घाणीमुळे परिसरात नावे ठेवले जात होते. या समाजातील तरुणांनी तसेच सर्व बांधवांनी स्मशानभूमी वृक्षारोपण व सुशोभीकरण काम हाती घेतलं.
यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा तसेच सुशोभीकरणचा छान कार्यक्रम घेत आहात गावाचा विकास तरुणांनी हातात घ्यावा ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक शेळके, कृषी सहाय्यक प्रशांत जाधव, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. डॉ. अरुण जाधव, मा. सभापती डॉ. भगवान मुरुमकर, संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, मा. चेअरमन हनुमंत वराट, पत्रकार बाळासाहेब वराट, पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार, कैलास मुरुमकर, सुनिल पुलवळे, बबन गायकवाड, हरिभाऊ वराट, गंगाराम घोडेस्वार, योगेश घोडेस्वार, दादा घोडेस्वार, रोहित घोडेस्वार सर, अभिमान घोडेस्वार सर, माजी वन कर्मचारी रामभाऊ मुरुमकर, प्रभू वराट गुरुजी, रामचंद्र वराट गुरुजी, बंडू पुलवळे, नागराज मुरुमकर, रावसाहेब घोडेस्वार, त्रिंबक पुलवळे, आप्पासाहेब मुरुमकर, अनिल घोडेस्वार, अजित वराट, बिभीषण वराट, विठ्ठल पुलवळे, ग्रा. पं सदस्य महादेव वराट, अॅड. संपत पुलवळे, वाल्मिक कोल्हे, छगाताई, पुलवळे, विकी घोडेस्वार, रोहित घोडेस्वार, शिवाजी पुलवळे, दामू घोडेस्वार, सुमित घोडेस्वार, संजय घोडेस्वार, किसन घोडेस्वार, महेश घोडेस्वार, योगेश पुलवळे अनेक मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment