पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ जानेवारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, प्रा. लक्ष्मण ढेपे, डॉ. कैलास हजारे, दत्तात्रय सोले, बापूसाहेब शिंदे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, बापू ससाणे, संभाजी राळेभात, युवा नेते गणेश घायतडक आदिंसह राजेंद्र पवार मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार अशोक निमोणकर, नासिर पठाण, संजय वारभोग, याशिन शेख, सुदाम वराट, अशोक वीर, श्वेता गायकवाड, धनराज पवार, ओंकार दळवी, समीर शेख, पप्पू सय्यद, किरण रेडे, अविनाश बोधले, अजय अवसरे, सुजीत धनवे आदी पत्रकारांचा शाल, गुलाब पुष्प, पेन व डायरी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी वैजीनाथ पोले, शहाजी राळेभात, कैलास हजारे याशिन शेख, श्वेता गायकवाड या मान्यवरांनीही आपआपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सर्वांसाठी अल्पोपाहारचीही व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, आजच्या काळात जरी पत्रकारांची संख्या वाढली असली तरी माध्यमांचे प्रकारही वाढलेले आहेत आपल्या भागातील पत्रकारीता चांगली असून, पत्रकार, समाज, पुढारी व अधिकारी यांची चांगली नाळ जुळलेली आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर चांगले काम होत आहे. पत्रकारांना शासनाने मानधन दिले पाहिजे. पत्रकार जनतेचे म्हणणे मांडतात. त्यानुसार शासन धोरण ठरवत असते. स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारांना क्रांतीकारक व समाजसुधारक म्हणत होते. आजचा पत्रकार सेवक म्हणून काम करत आहे.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र पवार म्हणाले की, प्रगल्भ विचारांचा पत्रकार उन्मत्त सरकार व राज्यकर्त्यांना जागेवर आणण्याचे काम करू शकतो. आज देशातील अनेक प्रश्न माध्यमातून मांडण्याची गरज आहे. जामखेड तालुक्यातील पत्रकार निस्पृह व निष्पक्षपाती लिखाण करत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी मानले.
No comments:
Post a Comment