पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ फेब्रुवारी
काम करत असताना अनेक संघर्ष करावा लागतो एखादया गरीबाच्या जर बाजून आवाज उठवला तर स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो ,संघर्ष सोपा नाही गेले ३० वर्ष आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले परंतू याठिकाणी ज्या गोरगरिबांची सेवा ,पाठीमागे असल्यामुळे अनेक प्रसंगातून वेगेवेगळ्या प्रसंगातुन स्वतःचा जीव वाचवत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची टीम याठिकाणी काम करत असतो. सेवा केंद्र इथल्या गोरगरीब कष्टकरी माणसाकरिता आहे जो कोणी आडला नडला ज्याला खरच मदतीची गरज आहे कोणाला रक्ताची मदत असेल, कोणाला औषधाची ,जातीच्या दाखल्याची मदत असेल , शेतकरी कुठे नडला असेल तर प्रत्येक माणसाच्या हितासाठी हक्कासाठी सेवा देणार केंद्र आहे ऐक्या जातीच हे केंद्र नाहीये. जेव्हा जेव्हा गोरगरीब जनतेला सेवा पाहिजे असेल तेव्हा दरवाजा उघडा आहे. लढायचं आणि जिंकायच आणि पुढे जायच ही जिद्द मनामध्ये बाळगून आम्ही सर्व सहकारी कामाला लागलोत . वर्षानुवर्ष झोपडीत राहणाऱ्या मुस्लिम मदारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्य सरकारकडून मंजूर करून आणली व खर्डा ग्रामपंचायत येथे वेळोवेळी पाठपुरावा करून आज माझ्या त्या लढ्याला देखील यश आले आहे .गेले ९ वर्षे खर्डा येथील प्रलंबित असलेला मुस्लिम मदारी समाजाचा वसाहतीचा प्रश्न अखरे मार्गी लावला याच मला समाधान आहे. असे प्रतिपादन बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वयक ॲड.अरुण (आबा )जाधव यांनी खर्डा येथे भेटके -विमुक्त संसाधन केंद्र उद्घाटन प्रसंगावेळी व्यक्त केले .
काल दि. १ फेब्रुवारी२०२४ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे डॉ. लाड हॉस्पिटल तळ मजला , खर्डा बसस्थानक समोर सायंकाळी ४.३० वाजता
भटके विमुक्त संसाधन केंद्र व समुदाय मदत केंद्रचे उदघाटन खर्डा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व सरपंच संजविनी पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाले आहे .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वयक ॲड .डॉ.अरुण (आबा)जाधव , सरपंच संजविनी पाटील, सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना सुनील लोंढे, संचालक ग्रा.वि.केंद्र बापूसाहेब ओहोळ, माजी सरपंच संजय गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, डॉ.लोंढे, डॉ.लाड , पत्रकार श्वेता गायकवाड, बाळासाहेब शिंदे ,धनसिंग साळुंखे , किशोर दुषी उपस्थित होते.व मुस्लिम मदारी समाज, व खर्डा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वयक डॉ.अरुण (आबा) जाधव ,सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड , सरपंच सौ.संजविनी पाटील,संचालक ग्रा.वि.केंद्र बापूसाहेब ओहोळ,माजी सरपंच संजय गोपाळघरे , माजी सरपंच आसाराम गोपाळघरे , डॉ लाड, डॉ लोंढे, बाळासाहेब शिंदे, कुशोर दुषी यांनी आपले मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त गाडे सर यांनी केले.
No comments:
Post a Comment