जामखेड तालुक्यातील जवळके येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात चंदनाचा साठा सापडला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीस दोन दिवसांची वनकस्टडी देण्यात आली आहे.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील जवळके येथे दि १० फेब्रुवारी रोजी दुपारी चंदनाची तस्करी व चंदनाचा साठा असलेची गोपनिय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने उपवनसंरक्षक अहिल्यानगर, धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गशनाखाली सहा. वनसंरक्षक, राहुरी, गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन मारूती शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे, वन मजुर राघु सुरवसे, शिवाजी चिलघर यांच्यासह जामखेड तालुक्यातील जवळके ता. जामखेड याठिकाणी सदर घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गिर्हाईक पाठवुन खात्री केली त्यानुसार सदर ठिकाणी आरोपी काका वर्धमान वाळुंजकर हा चंदन तरकरी करत असल्याचे समजले. सदर ठिकाणी आरोपीसह ३५ गोण्या ढलप्या व सालपट, चंदनाच्या गाभ्याचा १ तुकड़ा (वजन १.४ किलो), वाकास-३, तराजु-१, एक मोबाईल व मोटारसायकल असा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी राऊंड गुन्हा क्र.ओ-०४ / सन २०२४-२५भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२,५१,५२,६९ व महाराष्ट्र वननियमावली २०१४ नियम क्र. ३१५५ अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीस ज्युडिशियल मेंजीस्ट्रट प्रथम वर्ग-१ जामखेड ता-जामखेड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.पुढ़ील तपास उपवनसंरक्षक अहिल्यानगर धर्मवीर सालविद्ठल साहेब (1FS) यांच्या मार्गशनाखाली सहा.वनसंरक्षक ( राहुरी) गणेश मिसाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी, कर्जत( प्रा.) मोहन मारूती शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे, व वनकर्मचारी करीत आहेत.
तरी या गुन्ह्याबाबत अथवा वन विषयक गुन्हे घड़त आसतील कींवा काही माहीती असल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत/वनपरिमंडळ कार्यालय जामखेड यांच्याशी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी, मोहन शेळके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment