जामखेड प्रतिनिधी- 31 ऑगस्ट2025
आगामी काळात कर्जत जामखेड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीमध्ये आदिवासी भटके समाजातील जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी केले. ग्रामीण विकास केंद्र जामखेड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात भटके स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, आदिवासी नेते अनिल जाधव, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे नंदू मोरे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात दादा आंबेडकर म्हणाले की, वेळप्रसंगी समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन आपण कर्जत जामखेड तालुक्यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक का मोठ्या उत्साहाच्या वातावरणात लढवायच्या आहेत. इथून पुढे आपले प्रश्न आता आपल्यालाच मांडावे लागणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आपले हक्काचे विचारपीठ सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपल्याला आपल्याला गुन्हेगार कोणी बनवले ? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील आपले प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या बाबत आपण सरकारला जाब विचारला पाहिजे असे ते म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मायक्रो ओबीसींचे 23 उमेदवार उभे केले होते. याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली. दलित आदिवासी व भटक्या विमुक्तांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा आपण एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशींची केस अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः कोर्टात वकील म्हणून उभा राहून जिंकली. अशा अनेक लढाया आपल्याला भविष्यकाळात लढायच्या आहेत आणि त्या जिंकायचे आहेत असे ते असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की, या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र या देशातील आदिवासी आणि भटके विमुक्तांना मात्र 31 ऑगस्ट 1952 ची वाट पाहावी लागली. ज्या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, ते संविधान अजून आदिवासी भटके भुक्तांच्या पालापर्यंत पोहोचले नाही. हे संविधान आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काम करावे लागेल. इथून पुढे रडायची नाही तर लढाईची भाषा केली पाहिजे कारण बाबासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. गेल्या ८० वर्षाच्या काळात एकाही राजकीय नेत्यांनी आदिवासी व भटके विमुक्त समाजातील प्रतिनिधींचा सन्मान केला नाही. त्यामुळे आपला सन्मान होण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्याना यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. एडवोकेट डॉक्टर अरुण जाधव म्हणाले की, आपल्याला आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, आणि प्रस्थापितांची गुलामी करायची नसेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब होय. तुमच्या आमच्यासारख्या रस्त्यावर लढणाऱ्या अनेक सर्वसामान्य कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी आंबेडकर घराण्याने घेतली आहे. त्यामुळे इथून पुढे इतर कुणाशीही पंगा घ्या, मात्र आंबेडकर घराण्याची कदापिही पंगा घेऊ नका असा कडक इशारा त्यांनी प्रस्थापितांना दिला. यावेळी आदिवासी नेते अनिल जाधव, नंदू मोरे, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण यांचीही भाषणे झाली.भटके-विमुक्त, आदिवासी संयोजन समितीच्या सदस्या उमाताई जाधव यांनी प्रास्ताविक केले. ललिता पवार, लता सावंत, पल्लवी शेलार, रेश्मा बागवान व शितल पवार यांनी विविध ठरावांचे वाचन केले. बापू ओव्होळ, राजू शिंदे, तुकाराम पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील भटके विमुक्तांच्या संशोधन अहवालाचे वाचन केले. सकाळी 11 वाजता जामखेड येथील तहसील कार्यालयापासून भटके मुक्तांची रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये बहुरूपी, गोसावी, उमाजी नाईक वेशभूशा, वासुदेव, मरीआईवाला, पोतराज, नंदीवाले, कुरमुडी जोशी, स्मशान जोगी, फासेपारधी, वैदु, उंटवाले, जोशी, वाघ्या मुरळी, मदारी, भोई, डोंबारी, कैकाडी, आदी सहभागी झाले होते
महावीर मंगल कार्यालयातील विचार पिठावर सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी आणि सहकाऱ्यांचा नवयान आंबेडकरी जलसा सादर झाला. या परिषदेमध्ये मुस्लिम पंच कमिटी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी संघटना, प्रहार संघटना यांच्या सह समविचारी पक्ष आणि संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, सोमनाथ भैलुमे, संतोष चव्हाण, वैजिनाथ केसकर, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश गायकवाड, रामदास गायकवाड, संदीप आखाडे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, अशोक मोरे, अंकुश पवार, कल्याण आव्हाड, कांतीलाल जाधव, आतिश पारवे, राहुल पवार, शब्बीर भोसले, डीसेना पवार, भीमराव सुरवसे , सचिन चव्हाण, बापू गायवाड, सुरेखाताई सदाफुले, उर्मिला कवडे, मंगल शिंगाने, शितल काळे, आसाराम काळे, अविनाश काळे, गणपत कराळे, नरसिंग भोसले, सिनिता कांबळे, लाला वाळके, जाकीर तांबोळी आदींनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा