खर्डा प्रतिनधी/२६ऑगस्ट२०२५
जामखेड तालुक्यातील सातेफळ गावात एका दुर्दैवी घटनेत, बाळासाहेब दाताळ (वय ४५, रा. सातेफळ) यांचा २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता कडबाकुट्टीच्या ठिकाणी विजेचा करंट लागून मृत्यू झाला. ते त्यांच्या जनावरांना खाण्यासाठी कडबाकूट्टी येथे गेले होते, तेव्हाच करंट आला आणि कुट्टीवर चिकटल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे सातेफळ परिसरात मोठी शोककळा पसरली असून गावकऱ्यांत दु:ख व्यक्त केले जात आहे. मृत शेतकऱ्याच्या मागे दोन मुले, पत्नी आणि एक मुलगी असा कुटुंब आहे, ज्यांच्यावर आता या दुर्दैवी अपघाताने मोठा शोक आणि संकट आले आहे.
सातेफळवासीयांनी बाळासाहेब यांच्या पश्चातित्तासाठी प्रशासनाकडे अन्याय न होऊ देण्याची आणि सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रसंगामुळे ग्रामीण भागातील विजेच्या सुरक्षेची आणि अपघात टाळण्याची गरज अधोरेखित होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा