जामखेड प्रतिनिधी :३ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. सदर पिकांच्या तसेच काही ठिकाणी अंशतः घर पडझड झालेल्या ठिकाणी पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. पिक नुकसान पाहणीसाठी दि. २४ आॅक्टोबर महसूल मंत्री व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा व परिसरात पाहणी दौरा केला होता. त्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सुचानाप्रमाणे प्रत्येक गावात स्थानिक पातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या सहाय्याने पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. तसेच अनावधानाने कुणाचे पंचनामा करण्याचा राहून गेला असेल तर अशा शेतकरी यांनी आपल्या शेताचा फोटो आणी अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
यामध्ये आदेशानुसार तालुक्यातील ८७ महसूल गावात केलेल्या पंचनाम्यानुसार २३६५६ शेतकऱ्यांच्या १३९९५ हेक्टर पिकांचे नुकसान तर ११ कच्च्या घरांचीही अंशतः पडझड झालेली आहे. या नुकसानीपोटी शासनाकडे २२ कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. पिकांच्या नुकासानीमध्ये जिरायत पिकांचे १९५२७ शेतकरी यांचे ११९९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये प्रामुख्याने सोयबीन, उडीद, मुग या पिकांचा समावेश आहे . बागायत आणि हंगामी बागायत पिकांमध्ये एकूण ४१२९ शेतकऱ्यांचे २००५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यात प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमाटो या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे वरील सर्व पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडे जिरायत पिकांसाठी १६.३१ कोटी, बागायत पिकांसाठी ५.४१ कोटी, असे एकूण २२ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची मागणी केलेली आहे. शासन निर्णयाप्रमाणे जिरायत पिकांसाठी प्रती हेक्टरी १३६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७००० रुपये आणि फळ पिकांसाठी ३६००० रुपये अशी अनुदान वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यावर तात्काळ शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. अंशतः पडझड झालेल्या ११ घरांसाठी नवीन निकषप्रमाणे १.६५ लाख एवढे अनुदान मागणी करण्यात आलेली आहे. तसेच या कालवधीत शेतात काम करणाऱ्या १ जनावारांचा (बैल) वीज पडून मृत्यू झाल्याने त्यासाठी ३०००० रुपये अनुदान मागणी करण्यात आली आहे.
अनुदान वाटप कारनेकामी शेतकरी यांनी आपले बँक खाते नंबर तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांचेकडेस जमा करावे असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment