खर्डा प्रतिनिधी :२ नोव्हेंबर
खर्डा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही तलावात पाणी असतानाही खर्डा ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे गेल्या १५ दिवसापासून खर्डा शहरात पाणी येत नव्हते याबाबत
ऐन दिवाळीमध्ये खर्डा वासियांना पाण्याशिवाय दिवाळी साजरी करावी लागली. खर्डा गावाला पाणीपुरवठा करणारे मोहरी व खैरी हे दोन्ही तलाव नुसते भरलेले नाही तर तुडुंब भरून वाहत आहेत, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली होती. यामुळे भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद्र सुरवसे यांनी केलेल्या उठावची काल दि. १ नोव्हेंबर रोजी पोलीस वारंटच्या माध्यमातून या संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. आणि आज १५ दिवसांनंतर नळाला पाणी आले.
यामुळे खर्डा शहरातील नागरिकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलीस वारंट व विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे यांचे नागरिकांमधून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
अशातच नागरिकांमध्ये पडलेला प्रश्न , पाणी नेमकं कधी येणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू होती अशातच पोलिस वारंट ने लावलेल्या बातमीमुळे प्रभाव झाला व ग्रामपंचायत ने लगेच आज पाणी सोडले ग्रामस्थांचा सर्वात मोठा पाणी प्रश्न सोडवल्यामुळे आज सर्वत्र आनंदाचे व समाधानाचे वातवरण झाले आहे. खर्डा पाणी प्रश्न सोडवल्यामुळे अशाच नागरिकांमधील प्रश्न सोडवावे व काम करत राहावे अश्या प्रतिक्रिया पोलीस वारंट या वृत्तपत्राला दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment