खर्डा प्रतिनिधी : ९ नोव्हेंबर
ज्यांनी खोक्यांच्या माध्यमातून सरकार स्थापन केले त्या शिंदे फडणवीस सरकारमधील अशा प्रकारच्या वाचाळवीर
मंत्र्यांमध्ये सत्तेचा किती माज आलाय आपण बघीतला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात जी अश्लील टिप्पनी केली त्याचा सर्व महाराष्ट्रात निषेध होतोय. या सरकारमधील सगळ्याच वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. व सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे.
खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करत
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास जोडे मारुन, व पुतळा दहन करत तीव्र घोषणाबाजीसह निषेध आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना निवेदन देत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र भाषेत निषेधही करण्यात आला.
यावेळी खर्डा सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, संचालक राजेंद्र गोलेकर, एजाज जिकरे, चंद्रकांत गोलेकर, सुहास पाटील, तात्या ढेरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष लष्करे, विकास शिंदे, कपिल लोंढे, राम शिंदे, भिमा घोडेराव, सुरज रसाळ, प्रशांत वारे,दत्तराज पवार, दत्तात्रेय भोसले, वाल्मिक गोलेकर, हरीदास गोलेकर, संतोष वीर, अक्षय गोलेकर, नितीन गोलेकर, राजेंद्र सुर्वे, कैलास गोलेकर, काशीनाथ सदाफुले, पोपट भुते ,सुरेश ढेरे, सुरेश साळुंके, संदिप बिरंगळ,मोहन सुरवसे, विठ्ठल लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विजयसिंह गोलेकर म्हणाले की,
खऱ्या अर्थाने हे सगळे वाचाळवीर. शिंदे फडणवीस सरकारमधील हे सगळे वाचाळवीर पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे असल्याचे दिसून येते. गावामध्येही काही स्थानिक कार्यकर्ते आपल्याला वाचाळवीर असल्याचे दिसून येईल. काल खर्डा येथेही एक सामाजिक किल्ले बनवा स्पर्धा कार्यक्रम होता. या ठिकाणी आ. रोहित पवार यांच्यावर विना कारण टिका करण्याचे काम काही वाचाळवीरांनी केले. अशा प्रकारच्या अराजकीय कार्यक्रमतही हे वाचाळवीर राजकारण आणतात आणि आपल्या वाचाळपणामुळे स्वतः अडचणीत येतात.
आपण पाहिल तर शेतकऱ्यांपुढे भरपूर प्रश्न आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, लाईट असे अनेक प्रश्न असताना त्याकडे लक्ष द्यायचे सोडून ते अशा वाचाळ गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रत स्त्रियांच्या विरोधात बोलणाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा असे मी सरकारला अवाहन करतो. मागील काही दिवसांपूर्वीही येथील स्थानिक आ. राम शिंदे यांनीही बारामती ॲग्रोच्या विरोधात वाचाळगीरी केली पण साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोला क्लिन चिट दिली. या सरकारमधील सगळ्याच वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. व सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करतो
आपण पाहिल तर शेतकऱ्यांपुढे भरपूर प्रश्न आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, लाईट असे अनेक प्रश्न असताना त्याकडे लक्ष द्यायचे सोडून ते अशा वाचाळ गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रत स्त्रियांच्या विरोधात बोलणाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सरकारने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा असे मी सरकारला अवाहन करतो. मागील काही दिवसांपूर्वीही येथील स्थानिक आ. राम शिंदे यांनीही बारामती ॲग्रोच्या विरोधात वाचाळगीरी केली पण साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोला क्लिन चिट दिली. या सरकारमधील सगळ्याच वाचाळवीरांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. व सरकारने अब्दुल सत्तारचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करतो
No comments:
Post a Comment