जामखेड प्रतिनिधी : ६ जानेवारी
महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान म्हणून अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी एकता व एकत्मतेने जयंती साजरी केली जाते. पत्रकारिता समाजाचा तिसरा डोळा असतो. ते समाजातील प्रत्येक घटकाचे काम प्रामाणिकपणे करत असतात. त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. असे मत उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) यांनी केले.
मराठी वृत्तपत्र जनक अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त भाजपाचे जामखेड तालुका व सारोळा गावचे सरपंच ॲड. अजय (दादा) काशिद मित्र मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
जामखेड येथील ॲड. अजय (दादा) काशिद यांच्या जामखेड येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमासाठी उप महाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद, सत्कार समारंभाचे आयोजक अजय (दादा) काशिद, आपटी गावचे उपसरपंच आप्पासाहेब ढगे, पत्रकार नासिर पठाण, मिठूलाल नवलाखा, दत्तात्रय राऊत, संजय वारभोग, मैनुद्दीन तांबोळी, याशिन शेख, लियाकत शेख, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, समीर शेख, अशोक वीर, सत्तार शेख, अविनाश बोधले, श्वेता बापूसाहेब गायकवाड, किरण रेडे, अजय अवसरे, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, डाॅ. प्रदिप कुडके, डॉ. सुशिल पन्हाळकर युवक कार्यकर्ते सुरज काळे , भाजपा कोषाध्यक्ष ऋषिकेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त करताना कार्यक्रमाचे आयोजक अजय काशिद म्हणाले की, आजच्या धावपळीच्या काळात पत्रकारिता करणे खूप कसरतीचे काम झाले आहे. समाजात काय होते ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम उन, वारा, पाऊस, कुटुंब यांची पर्वा न करता पत्रकार करत असतात. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आप्पासाहेब ढगे, प्रास्ताविक किरण रेडे यांनी तर आभार अजय (दादा) काशिद यांनी मानल
No comments:
Post a Comment