पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२७ जून
जामखेड शहर किंवा जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत कोणीही समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची गये केली जाणार नाही. कारण समाजातील चांगल्या व शांतताप्रिय व्यक्ती आमच्या सोबत असून त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी जामखेड पोलीस दल नेहमीच कटीबध्द असेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिले.
आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद हे एकाच दिवशी येणारे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत व कोणीही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आज दि २७ जून रोजी रोजी सायंकाळी ६:०० ते ७:१० वाजताचे दरम्यान जामखेड पोलीस दलाच्या वतीने जामखेड शहरात रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चची सुरुवात जामखेड पोलीस स्टेशन येथे होऊन बीड रोड काॅर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बसस्थानक-मेन रोड-खर्डा चौक या मार्गावरून जाऊन खर्डा चौकातील पोलीस चौकीजवळ या रूट मार्चचा समारोप करण्यात आला.
यावेळी जामखेडकरांना शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन करताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता राखण्यासाठी मी काही व्यक्तिंना अगोदरच तडीपार केलेले आहे. काहींचे तडीपारीचे तर काहींचे स्थानबद्धतेचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत . काहींनी जामखेड शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काहींवर विभागीय दंडाधिकारी यांचेमार्फत कारवयास सुरू आहे. गुन्हेगारांवर कठोर शासन व सज्जनांचे रक्षण करू हाच आजच्या रूट मार्चचा उद्देश आहे. सज्जनांचे रक्षण करून व दुर्जनांचा निर्धारण करू असाही संदेश यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला.
पोलीस निरीक्षक महेश पाटील ,सफौ. शिवाजी भोस,पोलीस नाईक अजय साठे,पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे,दत्तु बेल्हेकर,चालक पोहे काँ अडसूळ व
१ अधिकारी २५ पोलीस अंमलदार, ४ होमगार्ड यांच्या सामावेश होता साधारण सव्वा तास चाललेला रूट मार्च शांततेत संपला आहे.
No comments:
Post a Comment