पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२२ जुलै
मनिपूरमध्ये थौबाल जिल्ह्यात जी घटना घडली व त्यात ज्या दोन महिलांची धिंड काढली ती घटना प्रचंड निदांजनक असुन माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने व्यथित व संतापून सदर समाजकंटकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी जामखेडचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपल्या भारत देशाची ख्याती विविध संस्कृतीने व सौजन्याने नटलेली आहे. त्याचा डंका संपूर्ण जगात गाजत आहे. परंतू मनिपूर राज्यामध्ये मागील काही महिन्यापासून हिंसाचार, अत्याचार व दंगल असे प्रकार चालू आहे. पण त्याठिकाणचे राज्याचे सरकार व भारतीय कायदा सुव्यवस्था संपलेली आहे असे चित्र दिसत आहे. अशा बदमाश लोकांना कायदा सुव्यस्थेचा व न्याय व्यवस्थेचा कसलाही धाक राहीला नाही याला जबाबदार कोण?
त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर प्रकरण चालवावे व त्यांनाही भरचौकामध्ये लाईव्ह देशासमोर फाशी देण्यात यावी व मनिपूर राज्य सरकार भारताच्या केंद्र सरकारने तातडीने बरखास्त करावे. जेणेकरून आपली भारत माता मोकळा श्वास घेईल व लोकशाहीच्या मूल्यावर विश्वास राहील. असे निवेदनाद्वारे मागणीकरून निषेध व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment