पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २२ जुलै
खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसून पाठिंबाच आहे. आम्ही आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. ग्रामसभेत विषय मांडण्याचा गावातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मात्र तो विषय योग्य रीतीने मांडला जावा. जे नागरिक व युवक हे मुद्दे उपस्थित करत आहेत त्या युवकांना मला विचारायचं कि, गेल्या अडीच वर्षात हा ग्रामपंचायत विभाजनाचा प्रश्न तेव्हा का काढला नाही ? आत्ताच हट्ट का ? गेल्या अडीच वर्षात सरपंच हे राष्ट्रवादीचे महिला सरपंच होत्या व त्यांचे पती सर्व नियम बाह्य करून स्वतःच खुर्चीवर बसायचे. स्वतःच सह्या करायचे. तेव्हा त्यांना कोणी प्रश्न का विचारला का नाही. पतीराज नियम हटवा आत्ताच का? तेव्हा का प्रश्न केला नाही. आज फक्त भारतीय जनता पार्टीचा सरपंच आणि उपसरपंच आले असल्याकारणाने विरोधकांना बघवत नाही म्हणून काही कार्यकर्ते अंधारातून समर्थन करत आहेत. अशाप्रकारे गावातील युवकांना पुढे करून मुद्दामून राजकीय द्वेषाने पडद्यामागून काही राजकीय नेते याला पाठबळ देत आहेत. जे कोणी कार्यकर्ते याच्यात पुढे होत आहेत. त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर ते कोणाचे कार्यकर्ते आहेत व हे कशासाठी करत आहेत हे सर्वांच्या लक्षात येईल. काही पुढारी स्वतःच्या मतलब साठी या ठिकाणी गावातील तरुणांना भडकवले जात आहे या ठिकाणी तरुणांना आव्हान करतो की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडा मला प्रश्न करा. पण असे राजकारण करू नका असे मत भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील महत्त्वाच्या खर्डा ग्रामपंचायत मध्ये सत्तापरिवर्तन होऊन या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता जाऊन ती ग्रामपंचायत रविंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या ताब्यात आली. तेंव्हा पासून विरोधक गावातील तरूणांना पुढे करून ग्रामपंचायत व गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसारच नुकत्याच झालेल्या ग्रामसभा व मासिक सभा यामध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात आली पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे यांनी सरपंच संजीवनी पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे , ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, राजू मोरे, व भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना रविंद्र सुरवसे म्हणाले की, आमचा खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनासाठी विरोध नाही तर पाठिंबा आहे. मात्र मला युवकांना एक विचारायच की, गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीच्या महिला सरपंच होत्या व त्यांचे पती सर्व नियम बाह्य करून स्वतःच खुर्चीवर बसायचे. ते सरपंचाच्या स्वतःच सह्या करायचे. तेव्हा त्यांना कोणी प्रश्न का विचारला का नाही. तेव्हा पतीराज हटवा अशी मागणी का नाही केली. ती आत्ताच का? तसेच गेल्या अडीच वर्षात ग्रामपंचायत विभाजनाचा प्रश्न का नाही काढला ? आत्ताच हट्ट का ?
भारतीय जनता पार्टीचा सरपंच आणि उपसरपंच झाल्याने विरोधकांना बघवत नाही. म्हणून काही कार्यकर्ते अंधारातून विरोध करत आहेत. व अशाप्रकारे गावातील युवकांना पुढे करून मुद्दामून राजकीय द्वेषाने पडद्यामागून काही राजकीय नेते याला पाठबळ देत आहेत. जे कोणी कार्यकर्ते पुढे येत आहेत त्यांच्याकडे जर पाहिलं तर ते कोणाचे कार्यकर्ते आहेत व कशासाठी करत आहेत हे लक्षात येईल.
काही कार्यकर्ते स्वतःच्या मतलबसाठी गावातील तरुणांना भडकवले जात आहे. त्यामुळे या तरुणांना आव्हान करतो की, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडा मला प्रश्न करा. राजकारण करू नका. काल मासिक सभेत जो महिला सरपंच व महिला उपसरपंच यांना दमदाटी व शिवीगाळ तसेच अरेरावीची भाषा केली ते कितपत योग्य आहे. राष्ट्रवादीचा सरपंच व उपसरपंच सरपंच झाला नाही. म्हणून ग्रामपंचायत तोडण्याची भूमिका मांडली आहे.
काल सरपंच संजीवनी पाटील यांनी पण स्पष्टपणे सांगितले की, गेल्या अडीच वर्षात शासनाचा पाठपुरावा करून जेवढे काही निकृष्ट दर्जाचे कामे झालेले आहेत ते काढणार. ग्रामपंचायत विभाजनाला आमचा विरोध नाही तरीपण त्यांनी निवेदन न देता ग्रामपंचायतीला कुलूप लावले दादागिरी केली जात आहे हे पडद्यामागील अंधारातील कार्यकर्त्यांना सांगणं आहे की तुम्ही कामाला विरोध करा पण वैयक्तिक विरोध करू नका . कारण आमचा ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा आहे असे मत रवींद्र सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे मत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment