पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील साकत येथील शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ /०६ साली आर.आर .बी कंपनीला पवनचक्की उभारण्यासाठी दिल्या होत्या.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला रोजगार मिळणार होता परंतु कंपनीने शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात जमिनी घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारला नाही, त्यामुळे रोजगार मिळाला नाही त्या जमिनीचा कर ही भरला गेलेला नाही त्यामुळे त्या जमिनी शासन जमा झाले आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले कारण कि रोजगाराची संधी उपलब्ध होईल या उद्देशाने जमिनी दिल्या. परंतु जमिनीही गेल्या व रोजगारही नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत .काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपनीने पवनचक्य्या उभ्या केल्या व काही कालावधीनंतर त्या पवनचक्की काढल्या गेल्या.पवनचक्की काढल्यानंतर काही एजंट मार्फत स्थानिक शेतकऱ्यांना व मूळ मालकाला विचारात न घेता त्या जमिनीची विक्री करण्यात आली आहे. या सर्व जमिनी मूळ मालकांना कायदेशीर कर भरून परत मिळाव्यात या मागणीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या त्या जमिनी मिळाव्यात यासाठी सरकारने यामध्ये लक्ष घालून मूळ मालकांना त्या जमिनी मिळवुन देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या गेलेल्या जमिनी पायी शेतकरी आज हातास झाला आहे. पुढे जर ही जमीन शेतकऱ्यांना नाही मिळाली तर अनेक शेतकरी आत्महत्या केल्या शिवाय त्यांच्या पुढे पर्याय राहिला नाही. शेतकऱ्यांनी मुले नोकरीला लागतील या आशेवर जमिनी दिल्या होत्या, जमिन पण गेली आणि नोकरी पण नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुढे जगावे का ? मरावे हेच कळेना.! जर जमिन परत मिळाली तर ती पिकवुन शेतकरी जगु शकतो.
यावेळी डॉ.भगवान मुरूमकर, श्रीराम मुरुमकर, नागराज मुरुमकर, सुरेश मुरुमकर, आप्पा मुरुमकर,भागवत मुरुमकर, बाळकृष्ण सरोदे, संतोष सरोदे, मुरलीधर मुरुमकर,सुदाम मुरुमकर,लहु मुरुमकर,संजय मुरुमकर, संतोष घोडेस्वार,शरद घोडेस्वार, गणेश मुरुमकर, बळीराम घोडेस्वार, मोतीराम घोडेस्वार, दादासाहेब मुरुमकर, नवनाथ मुरुमकर, हनुमंत मुरुमकर,राम मुरुमकर, गोवर्धन मुरुमकर, विजय घोडेस्वार आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment