पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ ऑक्टोबर
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागील काळात १७ दिवस उपोषण केले होते,सदरचे उपोषण सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले, त्यासाठी त्यांनी जरांगे पाटलांना चाळीस दिवसात मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. परंतु राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळला नाही. त्याच्या निषेधार्थ मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी अन्न व पाणी त्याग करून प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खर्डातील मराठा समाजातील युवक एकवटला असून यासंदर्भात शांततेच्या मार्गाने बसस्थानक परिसरात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे खर्डा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले, यावेळी सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच खर्डा व परिसरातील गावोगावी राजकीय नेत्यांना गाव बंदीचे डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत.
या अगोदरही मराठा आरक्षण मिळण्यासाठी खर्डा गाव बंद करण्यात आले होते, त्यानंतर येथील युवक संतोष साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी मोबाईलच्या उंच टावर वर चढून भगवा झेंडा फडकावून आत्महत्या करण्याचा धाडसी प्रयत्न करून आंदोलन केले होते. त्यातच दि. २९ ऑक्टोबर पासून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा पवित्रा घेण्यासाठी मराठा समाज सरसावला आहे.
No comments:
Post a Comment