पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -११ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कौतुका नदीच्या पुलाजवळ पाण्याचे डपके साचले असून कोणीही त्याकडे लक्ष देत नसल्याने रस्त्याने ये-जा करणारे नागरिक व वाहनधारक यांना
मोठा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. खर्डा येथून शिर्डी हैदराबाद महामार्गावर आत्ताच काही दिवसांपूर्वी पुलाचे काम झाले आहे. या पुलाच्या बाजूला जो पाण्याचा प्रवाह नदीला मिळला आहे. तेथे पाणी साचुन मोठे डबके तयार झाले असून वाहनांच्या येण्या जाण्याने अंगावर घाण पाणी उडत आहे. शिर्डी हैद्राबाद हा महत्त्वाचा माहामार्ग असल्या कारणाने त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठे आहे. तसेच
दररोज हजारो संख्येने शाळेतील विद्यार्थी याच रोडने जातात. एखादी गाडी आली की अंगावर घाण पाणी उडते. याकडे कोणत्याही राजकीय नेत्याचे लक्ष नाही. प्रशासनाचे लक्ष नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम तरी कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे
चौकट
खर्डा शहर हे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गांव असुन ऐतिहासिक दृष्ट्याही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र या गावच्या विकासाकडे प्रशासनाचे म्हणावे तेवढे लक्ष नाही. त्यामुळे येथील विकास कामे होताना दिसत नाहीत. यामुळे आमच्या बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहोत
No comments:
Post a Comment