पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -४ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील बऱ्हाणपूर येथिल गावचे सुपुत्र बाळराजे वाळुंजकर हे लवकरच रुपेरी पडघ्यावर झळकणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .जामखेड तालुक्यातील
बऱ्हाणपूर सारख्या छोटयाशा गावातून येत आपल्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी आपल्या अभियानाची सुरवात सोनी मराठी या वाहिनीवर "ज्ञानेश्वर माऊली "या मालिकेतून केली . त्यानंतर त्यांनी झी मराठी वाहिनीवर "तू चाल पुढं " या मालिकेत आपल्या अभियानाचा ठसा उमटवल्याचे दिसून आले . सध्या विविध प्रकारच्या अभिनयातून आपल्या आभियनाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यांनी अनेक सुप्रसिद्ध मालिकेत आपल्या अभिनयातून आपली ओळख निर्माण केली आहे. व ते आज पासून स्टार प्रवाह या चॅनेल वर मुरंबा आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतून वकील आणि मॅनेजरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. ठीक ६ वाजता मुरंबा व प्रेमाची गोष्ट ८ वाजता यावेळेत आपण त्यांना पाहू शकतो .तसेच अगदी ग्रामीण भागातून त्यांनी आपल्या जीवनाचा खडतर प्रवास केला असून , एकेकाळी घरात टीव्ही देखील नसताना अत्यंत कठणाईचा सामाना करून आज टीव्ही वरून पधड्यापर्यंतचा त्यांचा हा एक प्रेरनादायी प्रवास आहे .व त्यांच्या या यशाबद्दल जामखेड तालुक्यातुन व सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचे व कौतुकाचा वर्षाव होत आहे .
सध्या बाळराजे वाळुंजकर जामखेड तालुक्यातील नान्नज येथे पोस्टमास्टर या पदावर कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment