पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ डिसेंबर
प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी डिसेंबर महिना हा अभिमानाचा आणि गौरवाच दिवस आहे. भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराचा नमवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या युद्धामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतापूढे शरणागती पत्करली होती. त्यामुळे आज १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो . असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानक येथे पत्रकारांच्या वतीने आज दि. १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करण्यात आला सन १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्राना त्रिवार वंदन करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी सह्ययक पोलीस पोलीस निरीक्षक महेश जानकर,माजी सैनिक बबन नाईक , प्रकाश चौधार , बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील , शाळकरी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment