पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-११ जानेवारी
गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी निर्भिड पत्रकारिता पत्रकार करत आहेत. हे प्रसिद्धीसाठी नाही तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करत आहेत. माझी बदली मुंबई वरून जामखेडला अचानक झाली, जामखेडला बदली झाली असे मला माहित देखील नव्हते अचानक समजले ,याठिकाणी आल्यावर अंदाज घ्यायला वेळ लागला , तुम्हा सर्वांचे सहाकार्य लाभले ,मला गोरगरीब जनतेसाठी काम करायचे आहे. तुमच्यासारखेच समाजकारण करण्याची मला पण सवय आहे. म्हणून मी सामजिक दृष्टीतून काम करत असतो. तुमचे आणि आमचे काम सारखेच आहे पोलीस आणि पत्रकारांनी समन्वय साधून काम केले पाहिजे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण ,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक देवमाने ,नंदूसिंग परदेशी , यासिन शेख , वसंत सानप, संजय वारभोग,अशोक निमोनकर, फायकली सय्यद, श्वेता गायकवाड, लियाकत शेख ,मोहदद्दीन तांबोळी ,सुदाम वराट,ओंकार दळवी , समीर शेख, दत्तात्रय राऊत, अविनाश बोधले, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, अजय अवसरे, संतोष गर्जे, राजू भोगील, धनराज पवार, सुजित धनवे ,संतोष थोरात, दत्तराज पवार, धनसिंग साळुंखे,बाळासाहेब शिंदे, किशोर दुषी, अनिल धोत्रे , सचिन अटकरे मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की, लोकशाहीत पत्रकार महत्त्वाचा घटक आहे. पोलीस आणि पत्रकारांचे काम सारखेच असते, म्हणून आपण समाजात समन्वय साधून काम केले पाहिजे.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचे पुष्पफुल डायरी, पेन देऊन मान सन्मान करण्यात आला
यावेळी नासिर पठाण, दीपक देवमाने, वसंत सानप, नंदूसिंग परदेशी, संजय वारभोग , अविनाश बोधले, फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत , मोहदद्दीन तांबोळी ,बाळासाहेब शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार लियाकत शेख यांनी केले.
No comments:
Post a Comment